वृक्षारोपण 2016


                        आज जगात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असून त्यामुळे पाऊस अनियमित झाला आहे. पर्यावरणाचे  संवर्धन करणे आवश्यक आहे परंतु केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही. 'झाडे लावा झाडे जगवा' हा मूलमंत्र जपला पाहिजे. गेल्या वर्षी सगळीकडे दुष्काळ होता, त्याची झळ संपूर्ण महाराष्ट्राला बसली आहे. लातूर, विदर्भला तर रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला. वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणलीय. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली, प्रगती साध्य केली; परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले. याचेच परिणाम आज आपण पाहत आहोत. मानवाने आपल्या अतिरेकी महत्त्वाकांक्षेसाठी सिमेंटची जंगले बसविले. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. याच्याच परिणामी ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आज जगाला भेडसावत आहे. वातावरण बदलामुळे पावसाची अनिश्चितता वाढली आहे. 

" कावळा करतो काव काव, 
म्हणतो माणसा, एक तरी झाड लाव "

                             या म्हणी प्रमाणे पावसाळा आता सुरु होत आहे. प्रत्येक माणसाने एक झाड लावून त्याचे संगोपन केले तरी मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धन होईल. भारताची लोकसंख्या 121 कोटी पेक्षा जास्त आहे. किमान 121 कोटी माणसांनी प्रत्येकी एक नवीन रोप लावले व त्याचे संगोपन केले तरी त्यामुळे पर्यावरण प्रदूषण रोखण्यास मदत होईल. अन्यथा प्राणी मात्रा बरोबरच मानवी जीवन जगण्यात अडथळे निर्माण होतील. म्हणून सर्वांनीच निचय करूया कि ह्या पावसाळ्यामध्ये एक तरी झाड लावायचे व त्याचे संगोपन करायचे.

!!-वृक्ष संवर्धन ही सध्याची व भविष्याची गरज आहे -!!




Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj