Popular posts from this blog
निसर्ग मानवाचा सखा, सोबती !
निसर्ग म्हणजे काय ? असा प्रश्न अनेक वेळा मानवी मनात निर्माण होत असतो. पण निसर्ग म्हणजे नेमके काय? असा प्रश्न जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा मला वाटत निसर्ग म्हणजे मानवाचा मित्र, सखा, सोबती आहे. जसे कि अनेक अंगांनी फुलणारा, उमलणारा, मानवी जीवनात उन्मेष भरणारा हा सखा निसर्ग. सतत बदलणारा, बदलवणारा, प्राण्या – पश्यांनी बहरलेला हा सखा निसर्ग, संवेदनांना रिझवणारा, चांगल्या विचारांना चालना देणारा ...फक्त देणारच, काही न मागणारा, हा सखा निसर्ग ! निसर्ग मानवाला जगण्याची उमेद येतो, मन प्रसन्न करण्यासाठी वाऱ्याबरोबर सुगंध पसरवणारा, झाडाझाडांमधून बासरी वाजवणारा, सूर्यकिरणांनी उबदारपणा देणारा आणि चंद्राची शीतलता पसरवणारा हा सखा म्हणजे निसर्ग. त्याचं कौतुक करावं तेवढ थोडंच पाण्याबरोबर वाहणारा आणि पक्ष्यांमधून बोलणारा, स्वत:ची प्रौढी न मिरवता सारं शांतपणे सहज करणारा सखा. इतका चांगला मित्र मिळूनही माणूस स्वत: ला पोरका का समजतो ? तुम्ही निराश झालात, उव्दिग्न झालात तरी तो तुम्हाला शांत करतो कधी कधी...
Senapati Prataprao Gujar Smarak
सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील ‘नेसरी’ हे गाव मराठी माणसाच्या मनात पराक्रमाचे स्फुल्लिंग चेतवणारे गाव आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती ‘प्रतापराव गुर्जर’ यांची समाधी आहे. गडहिंग्लजच्या सुप्रसिध्द सामानगडापासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे मानकरी, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाने पवित्र झालेले धारातीर्थ आणि त्या पावन भूमीवर प्रतापराव गुर्जर यांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारक उभे आहे. इ.स. 1674 मध्ये आदिलशाही सरदार बेहलोल खानाच्या 20 हजारांच्या फौजेवर अवघ्या सहा स्वारानिशी मराठय़ांचे खुद्द सरसेनापती वेडय़ासारखे तुटून पडले. इतिहासातील एक अत्यंत विषम युध्द या परिसरात घडले. याच बेहलोल खानाला युध्दात हरवल्यानंतर सोडून दिल्याबद्दल छत्रपतींनी सेनापतींना खरमरीत पत्र लिहिले. ‘गनिमास गर्दीस मिळविल्याखेरीज आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका’ असे त्या पत्रात लिहिले होते. हे पत्र सरसेनापतींना मिळाले तेव्हा ते सहा स्वारांनिशी टेहळणीवर हो...