Posts

Showing posts from February, 2016

Sugarcane Farming Guide

Image
एकरी 100 टन उसासाठी व्यवस्थापन : ऊसाच्या चांगल्या वाढीसाठी मध्यम ते भारी स्वरूपाची जमिन असावी. माती परीक्षण करुन घ्यावे त्यानूसार जमिनीचा प्रकार,सामू व इतर उपलब्ध अन्नद्रव्ये याची तपासणी करून घ्यावी आणि त्यानूसार खतांचे नियोजन करावे. को-86032, को-94012, को-671 इत्यादी जातींचा वापर करावा. ऊस उत्पादन वाढीसाठी शेतक-यांनी आता जातींची निवड, जमिनीची मशागत, योग्य लागवड पद्धत, खत व्यवस्थापन या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उस पिकाच्या लागवड करताना जमिनीचा विचार करणे आता गरजेचे आहे. ऊस पिकास मध्यम, काळी ते भारी उत्तम पाण्याचा निचरा असणारी जमीन योग्य आहे. या पिकाची मुळे 1 ते 1.5 मीटर खोल जातात. मध्यम पोताच्या आणि 60 टक्‍क्‍यांपेक्षा जादा जलधारणाशक्ती असणा-या, सामू 6.5 ते 8.5 टक्के, क्षाराचे प्रमाण 0.5 पेक्षा कमी, चुनखडीचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी, तसेच उपलब्ध अन्नद्रव्यांचा साठा भरपूर असावा. पूर्व मशागत व सेंद्रिय खते – प्रथम जमीन खोल, उभी आडवी नांगरावी. नंतर 20 ते 25 टन अथवा 40 ते 50 बैलगाड्या प्रति हेक्‍टरी शेणखत अगर कंपोस्ट खत जमिनीत चांगले मिसळून द्यावे. सेंद्रिय ख

Water management for sugarcane

Image
उसासाठी पाणी व्यवस्थापन : उस शेतीमध्ये पाणी हा घटक अतिशय महत्वाचा आणि निर्णायक घटक आहे. म्हणून पाण्याचा कार्यक्षम काटेकोरपणे, नियोजनबध्दरीत्या वापर करून कमी पाण्यात जमिनीची सुपीकता आणि एकरी टनेज वाढवले पाहिजे. उसाला पाणी देण्याच्या पद्धती – ऊस पिकाला सरीवरंबा, कट वाफे पद्धत, सरी नागमोडी पद्धत सुधारित लांब सरी पद्धत, जोडओळ पट्टा पद्धत, एकसरी पट्टा पद्धत, रुंद सरी पद्धत, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन – रेनगन तुषार सिंचन पद्धत इ. पद्धतीन पाणी दिलं जात. कालावधी उसाच्या पिकाला उस उगवेपर्यंत म्हणजे पहिला १.५ महिना १/३ सरी भिजेल एव्हढं, फुट्व्याचा कालावधी १.५ ते ३ महिने अर्धी सरी भिजेल एवढ, कांडी सुटण्याची ते जोमदार वाढीच्या म्हणजे ३ ते १० महिने पाऊन सरी भिजेल एवढं आणि पक्वतेचा कालावधी म्हणजे १० महिने ते ऊस तुटेपर्यंत पूर्ण सरी भिजेल एवढं पाणी द्यावं. हंगामानुसार आणि ऊस पिकाच्या गरजेनुसार लागणीपासून तुटेपर्यंत पाण्याच्या पाळ्यातलं अंतर कमी जास्त कराव. योग्य पद्धत – पारंपारिक सरी, कटपध्दत, सरी वरंबा नागमोडी पद्धतीने पाणी देण्यात कोणताच फायदा होत नाही. उत्पादन कमी येत, जमिनी न

Cashew nut farming

Image
काजू लागवड कशी करावी : पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनींत, जांभा दगडापासून तयार झालेल्या वरकस जमिनीत काजूचे पीक चांगले येते. लागवडीसाठी वेंगुर्ला- 1, वेंगुर्ला- 4, वेंगुर्ला- 6, वेंगुर्ला- 7, वेंगुर्ला- 8 या जातींची कलमे निवडावीत. लागवड करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यांत 7 मीटर बाय 7 मीटर किंवा 8 मीटर बाय 8 मीटर अंतर ठेवून 60 बाय 60 बाय 60 सें. मी. आकाराचे खड्डे खणावेत. खड्ड्यात दोन घमेली शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळून या मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत. कलमांची लागवड पाऊस स्थिरावल्यानंतर करावी. कलमे लावताना कलमांची हंडी फुटणार नाही, याची काळजी घ्यावी. कलमाला काठीचा आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. कलमांच्या जोडावरील प्लॅस्टिकची पिशवी काढून टाकावी. आळ्यात गवताचे आच्छादन करावे. उन्हाळ्यात गरजेनुसार कलमांना पाणी द्यावे.

How to Plant and Grow Bamboo

Image
बांबूची लागवड : बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते आणि जास्त पाऊसमान असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते. पाणी देण्याची सोय असल्यास बांबूची लागवड सर्वसाधारणपणे आठ ते 25 अंश से. तापमान, सरासरी प्रति वर्षी 750 मि.मी. पाऊसमान आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असणे गरजेचे असते. अशा जमिनीत बांबूच्या कंदाची वाढ चांगली होते. क्षारपड, पानथळ जमिनी बांबूच्या लागवडीसाठी योग्य नाहीत. बांबूची अभिवृद्धी – अभिवृद्धी प्रामुख्याने बियांपासून व कंदांपासून करण्यात येते. बियांपासून अभिवृद्धी करताना बांबूची रोपे दोन प्रकारांनी तयार करतात – 1. गादी वाफ्यात बी पेरून व 2. पॉलिथिन पिशवीत बी लावून. बांबूची रोपे बियाणे पेरून करताना ती गादी वाफ्यावर पेरून तयार करावीत, त्यासाठी वाफ्याची लांबी उताराच्या आडव्या दिशेने ठेवावी. वाफ्याची रुंदी सर्वसाधारणपणे एक मीटर व लांबी सोयीनुसार दहा मीटर ठेवावी. गादी वाफ्यातील अंतर 30 सें.मी. ठेवून आडव्या ओळीमध्ये बी पेरणी करावी. बियांची पेरणी साधारणपणे सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये करावी. तीन ते चार महिन्यांनी रोपे पॉलिथिन पिशवीत लावावीत. तयार केलेली रोपे ज

Story of a Warrior...Great Shivaji Maharaj.

Image
Every day lived, by people of the kingdom, Lost their belief in God, lost their freedom, Every king came, filled pockets like hungry ruler, Happiness was lost, every person became more than beggar......, Every day lived, lost their daughters and wives, Lost trust in rulers, kingdom feared the knives, Temples and Hearts were broken and killed, Every River had skulls and blood was filled...., One day came, a boy named Shivaji was born, Small was he, thoughts of happy kingdom form, Birth by Jijaaisaheb and Shahajiraje a person of poorer, Every thought he gave made every heart dearer....., Every child trusted Shivaji, Every Mavla came for creating Swarajya the Gods Kingdom, Tanaji,Prataprao, Bajiprabhu came with love, Jadhav,Deshhmukh,Kashid,Shinde   came for ‘Swarajya’ and Peoples Freedom......, Forts,Durgs and Khinds  were together with great thoughts, Every Mavla gave blood and Victory was brought.....Tukaram, Ramdas and varkaris singed happiness song,Deccan,Kokan,